राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच4 मार्चपासून 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. शेतकरी प्रश्नांसह महागाईच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला केला. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे पोटनिवडणुक निकालानंतर राज्यातील घडामोडींना वेग. अने आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. तसेच आज अमित शाह बंगळुरुच्या दौऱ्यावर आहेत. पूर्वेकडील राज्य मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आहे. महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.